सुरती बोहऱ्यांचे जोडपे, मुंबईतील लोकसमूह  
१९०९-१९१२
रंगविलेली अर्धी भाजलेली टेराकोटा माती

सदर प्रतिमा सुरतच्या बोहरा जोडप्याच्या आहेत. बोहरी हे ईस्ट इंडिया कंपनीच्या आगमनानंतर मुंबई मध्ये स्थायिक होणाऱ्या पहिल्या समुदायांपैकी एक आहेत. जोरकस व्यापार आणि औद्योगिक केंद्र म्हणून शहराच्या विकासात बोहऱ्यांचा मोलाचा वाटा आहे.

एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धापासून ते विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत मुंबई शहरातील माणसं, त्यांची जीवनशैली आणि संस्कृती यांचं दर्शन कमलनयन बजाज मुंबई दालनातील मातीच्या प्रतिमांचा संचय घडवतो. ह्या प्रतिमा त्या काळातील कला ऐतिहासिक बदल आणि नवीन कला प्रकारांच्या निर्मितीसाठी केलेले नाविन्यपूर्ण उपक्रम चित्रित करतात.